मराठी जेवणाला "गरिबांचं जेवण" म्हटल्यावर विवेक अग्निहोत्रीवर संतापली ही अभिनेत्री

बुधवार, 20 ऑगस्ट 2025 (19:21 IST)
बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री  हे नेहमी चर्चेत असतात. सध्या ते त्यांच्या द बंगाल फाईल्स चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. दरम्यान त्यांचे एक मराठी जेवणावर दिलेले विधान चर्चेत आले असून विवेक अग्निहोत्रींना ट्रोल केले जात आहे. 
ALSO READ: रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाच्या सेटवर120 लोकांना अन्नातून विषबाधा
द बंगाल फाइल्स'च्या रिलीजपूर्वी, विवेक सतत प्रमोशनसाठी माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. यातील एका मुलाखतीदरम्यान, विवेक अग्निहोत्री यांनी मराठी जेवणाबद्दल एक विचित्र विधान केले आहे. ते म्हणाले मराठी जेवण हे गरिबांचे जेवण आहे. त्यांच्या या विधानावर त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. 
 
द काश्मीर फाइल्स सारखा सुपरहिट चित्रपट देणारे  विवेक अग्निहोत्री त्यांच्या  स्पष्टवक्त्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे. अलिकडेच त्यांनी द बंगाल फाइल्सच्या प्रमोशनसाठी एका फूड चॅनलला मुलाखत दिली. यादरम्यान, त्यांची  पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशीला विवेकच्या आवडत्या पदार्थाबद्दल विचारले असता, ती म्हणाली - मी कधीकधी त्याच्यासाठी मराठी जेवण बनवते, पण तो ते अजिबात खात नाही. तो म्हणतो, तू गरिबांसाठी जेवण बनवतोस का?
ALSO READ: ‘बिन लग्नाची गोष्ट’ - नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास
विवेकने गोष्टी स्पष्ट केल्या आणि म्हणाला- बघा, मी दिल्लीहून आलो आहे आणि तिथली खाण्याची पद्धत मुंबईपेक्षा खूप वेगळी आहे. जेवणात तरंगणारे अतिरिक्त तूप आणि मसाले जेवणाला खास बनवतात. मला इतके समृद्ध अन्न खाण्याची सवय आहे. आता जेव्हा मराठी जेवणाचा विचार येतो तेव्हा ते खूप आरोग्यदायी प्रकारचे असते. जास्त मसालेही नाही आणि तूपही नाही. म्हणूनच मी म्हणायचो की मला हे गरीब लोकांचे जेवण खायचे नाही.
त्यांच्या या वक्तव्यावर प्रेक्षक, चाह्त्ये, मराठी कलाकार देखील संताप व्यक्त करत आहे.. बिगबॉस फेम अभिनेत्री नेहा शितोळे हिने त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर चांगलीच लांबलचक पोस्ट केली असून संताप व्यक्त केला आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NEHA SHITOLE (@nehanachiket)

नेहा शितोळे लिहिते, मराठी जेवण म्हणजे गरिबांचे जेवण असे म्हणणाऱ्यांनी जेवणाचा नाही तर मराठी संस्कृतीचा अपमान केला आहे. वरण-भात, पुरणपोळी, उकडीचे मोदक सारखे खाद्यपदार्थ आपल्या संस्कृती, संस्कारला उब देणारे, जपणारे पदार्थ हे. या सात्विक जेवणाला गरिबांचे जेवण म्हणून शेतकऱ्यांचा अपमान आहे. जे आपल्याला अन्न मिळावे म्हणून, राबराब राबून घाम गाळतो.नेहाच्या या पोस्टवर नेटकरी आपापली प्रतिक्रिया देत असून नेहाच्या पोस्टचे कौतुक करत आहे. 
Edited By - Priya Dixit  
ALSO READ: ‘पाणी’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, प्रियांका चोप्राने आनंद व्यक्त केला

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती