मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची गळफास लावून आत्महत्या

रविवार, 18 मे 2025 (12:45 IST)
प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक आशिष अरुण उबाळे (58) यांनी शनिवारी गळफास लावून आत्महत्या केली. आशिषने नागपूरमधील धंतोली येथील रामकृष्ण मठाच्या अतिथी कक्षात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात खळबळ उडाली. आशिष हे मूळचे पुण्याचे होते. 
ALSO READ: ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते प्रकाश भेंडे यांचे निधन
त्यांनी 'बाबुराव ला पकड', 'जय गंगागिरी महाराज' आणि 'नाथ हा माझा' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लिहिली आहे. याशिवाय त्यांनी काही मराठी दूरदर्शन कार्यक्रमांचे दिग्दर्शनही केले. शुक्रवारी आशिष यांचा धाकटा भाऊ सारंगला भेटण्यासाठी नागपूरला आले  होते , असे सांगितले जाते. सारंग हे  रामकृष्ण मठाचे  सेवक आहे. सारंगने त्यांना  मठातीलच पाहुण्यांच्या खोलीत राहायला सांगितले होते.
 
शनिवारी जेवण झाल्यानंतर आशिष खोलीत आराम करण्यासाठी गेले  . सारंग त्याच्या कामात व्यस्त होता. सारंग दुपारी 4.50 वाजता खोलीत गेले असता त्यांना आशिष गळफास  घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी आरडा ओरड केले. त्यांची आवाज ऐकून लोग मदतीला धावले. पोलिसांना तातडीने कळविले. 
ALSO READ: ‘देवमाणूस’ भावनांनी भरलेला, थरारक अनुभव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. 
पोलिसांना आशिषचा मोबाईल तपासल्यावर त्याने स्वतःला मेसेज पाठवलेला आढळला.
 
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की आशिष उबाळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एक चिठ्ठी सोडली होती ज्यामध्ये त्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे लिहिले होते.
ALSO READ: ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचे सूत्रधार
आशिष उबाळे यांची चित्रपटसृष्टी आणि मराठी टेलिव्हिजनमध्ये दीर्घ आणि यशस्वी कारकीर्द आहे. 'अग्नी', 'एका श्वासाचे अंतर', 'गजरा' आणि 'चक्रव्यूह' अशा अनेक लोकप्रिय मराठी मालिका त्यांनी दिग्दर्शित केल्या. याशिवाय त्यांनी 'गार्गी' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली. 
Edited By - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती