कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींवर भारताचे लक्ष, पेट्रोलियम मंत्री म्हणाले

मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (09:27 IST)
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक तेलाच्या किमती वाढण्यावर भारत लक्ष ठेवून आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तसेच पश्चिम आशियामध्ये तणाव वाढल्यास ऊर्जा उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो.  
 
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढण्यावर भारत लक्ष ठेवून आहे. "आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत," असे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले. तसेच पश्चिम आशियामध्ये तणाव वाढल्यास ऊर्जा उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो. पण, मला विश्वास आहे की आम्ही पूर्वीप्रमाणेच कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ.
 
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी म्हणाले की, देश वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी तयार आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत तेलाच्या उपलब्धतेबाबत पुरी म्हणाले की, पूर्वी भारत 27 पुरवठादारांकडून तेल खरेदी करत असे, परंतु आता ही संख्या 39 झाली आहे. तेलाचा जागतिक पुरवठा सध्या वापरापेक्षा जास्त आहे, ज्यामुळे बाजारात स्थिरता येते. जर काही पक्षांनी उपलब्धता मर्यादित केली तर बाजारात नवीन पुरवठादार देखील आहेत. अल्पावधीत मला सध्या जगात तेलाचा तुटवडा दिसत नाही.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती