रब्बी पिकांसाठी MSP वाढवण्याचा सरकारचा निर्णय

गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (11:27 IST)
केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
केंद्र सरकारने गहू, बाजरी, हरभरा, मसूर, मोहरी आणि केशर यांची एमएसपी वाढवली आहे. गव्हाच्या एमएसपीत 40 रुपये, मोहरीच्या एमएसपीत 400 रुपये, सूर्यफुलाच्या एमएसपीत 114 रुपये, मसूरच्या एमसपीत 400 रूपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे.
 
बुधवारी (8 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठीत गहू, ज्वारी-बाजरी, मोहरी, वाटाणे-हरभरा अशा पिकांच्या एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच वस्त्रोद्योगाला प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) म्हणजे उत्पादनासंबंधी चालना देण्याच्या धोरणालाही मान्यता देण्यात आली आहे.
 
या क्षेत्रात 10 वेगवगेळ्या उत्पादनांसाठी पुढील 5 वर्षं 10,600 कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती