मुंबई- मागणी आणि पुरवण्याचे गणित बिघडून दर वर्षी कांद्याचा वांदा निर्माण होतो, ग्राहक आणि शेतकरी हितासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर व्यापक धोरण निश्चित करण्यात येत असल्याची माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
कांद्याची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई करण्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आल्याचेही मंत्री खडसे यांनी स्पष्ट केले. कांद्याच्या प्रश्नाबाबत बोलताना मंत्री खडसे म्हणाले, की मालेगाव, नाशिकसह राज्यातील काही भागांत साठेबाजी करणार्या ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत.