कांदा साठेबाजांवर कारवाई करणार: खडसे

गुरूवार, 27 ऑगस्ट 2015 (10:56 IST)
मुंबई- मागणी आणि पुरवण्याचे गणित बिघडून दर वर्षी कांद्याचा वांदा निर्माण होतो, ग्राहक आणि शेतकरी हितासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर व्यापक धोरण निश्चित करण्यात येत असल्याची माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
 
कांद्याची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई करण्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आल्याचेही मंत्री खडसे यांनी स्पष्ट केले. कांद्याच्या प्रश्नाबाबत बोलताना मंत्री खडसे म्हणाले, की मालेगाव, नाशिकसह राज्यातील काही भागांत साठेबाजी करणार्‍या ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत.
 
शेतकरी आणि ग्राहक हित साधून कांद्याचे भाव नियंत्रित करण्याचे शासन पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकार कांद्याचे दर निश्चित करण्यासाठी धोरण निश्चित करत आहेत.
 
कांद्याचे किमान निर्यात मूल्यदेखील वाढवण्यात आले आहे. बाहेरून कांदा आल्यानंतर वितरणासाठी गरज पडली तर रेशन दुकानावर कांदा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.

वेबदुनिया वर वाचा