20 व्या शतकाचा प्रमुख दीपस्तंभ हरपला

कर्मयोगी बाबा आमटे यांच्या निधनाने 20 व्या शतकाचा प्रमुख दीपस्तंभ हरपला अशा शब्दात ऊर्जा व तंत्रशिक्षण मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या शोकसंदेशात ते पुढे म्हणतात की, अखेरच्या क्षणापर्यंत ताजेतरुण असणारे, राष्ट्रीय एकात्मता आणि नवराष्ट्र उभारणीसाठी शेवटच्या श्र्वासापर्यंत झगडणारे थोर समाजसेवक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांनी स्थापन केलेले आनंदवन आणि मागच्या पिढ्यांना दिलेला वारसा यापुढेही आपल्याला आदर्शवत मार्गदर्शन करीत राहील.

वेबदुनिया वर वाचा