पुढील 5 वर्षांत मणिपूरला ईशान्येतील सर्वोत्तम राज्य बनवणार

गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (11:04 IST)
मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे, अत पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ येताच या ईशान्येकडील राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की काँग्रेसच्या काळात राज्यात अस्थिरता, अतिरेकी आणि विषमता होती. तर भाजपच्या राजवटीत नावीन्य, पायाभूत सुविधा आणि एकात्मता सुरू झाली.
 
 
अमित शाह म्हणाले की, आम्हाला मणिपूरला देशातील सर्वात मोठे स्पोर्ट्स हब बनवायचे आहे. आम्हाला या भागातील तरुणांना ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांपासून मुक्त करायचे आहे आणि त्यांना ऑलिम्पिक खेळांमध्ये समाविष्ट करायचे आहे, हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे.
 
अमित शाह म्हणाले की राज्याला जे हवे होते ते पंतप्रधान मोदींनी दिले. मणिपूरच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ 15 कोटी रुपयांचे संग्रहालयही बांधले जात आहे.
 
गेल्या 5 वर्षांत राज्याचा विकास करून हिंसाचारमुक्त केल्याचा दावा अमित शहा यांनी केला असून पुढील 5 वर्षांत मणिपूरला ईशान्य भारतातील सर्वोत्तम राज्य बनवण्याचे ध्येय असल्याचे ते म्हणाले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती