महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात एक अनोखे गाव आहे जिथे पुस्तकांबद्दलचा खूप मोठ्या प्रमाणात आदर केला जातो..या अनोखे गावाचे नाव आहे भिलार गाव आहे, ज्याला म्हणजेच 'पुस्तकांचे गाव' असेही म्हणतात. हे गाव डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व दर्शविणारे एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
भिलार गावाचा अनोखा उपक्रम
भिलार गाव हे महाराष्ट्र सरकारच्या एका अनोख्या उपक्रमाचे परिणाम आहे. २०१७ मध्ये, युनायटेड किंग्डमच्या हे-ऑन-वाय मॉडेलपासून प्रेरित होऊन महाराष्ट्र सरकारने भिलारला भारतातील पहिले 'पुस्तकांचे गाव' म्हणून घोषित केले. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट वाचन संस्कृतीला चालना देणे, पर्यटन आकर्षित करणे आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे हे होते.
प्रत्येक घरात एक ग्रंथालय
भिलारची सर्वात खास गोष्ट म्हणजे प्रत्येक घरात, सार्वजनिक ठिकाणी आणि अगदी स्थानिक भोजनालयांमध्येही लहान-मोठी ग्रंथालये उभारण्यात आली आहे. कविता, कादंबऱ्या, नाटके, आत्मचरित्र, लोककथा आणि बालपुस्तके यासारख्या मराठी साहित्याच्या विविध प्रकारांची पुस्तके या ग्रंथालयांमध्ये उपलब्ध आहे. ही पुस्तके अशा प्रकारे मांडली आहे की कोणताही वाचक त्याच्या आवडीचे पुस्तक सहजपणे शोधू शकेल आणि ते वाचू शकेल. विशेष म्हणजे ही पुस्तके वाचण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
तसेच येथे येणारे लोक त्यांचे मोबाईल सोडून पुस्तकांच्या जगात हरवून जातात. व ही अनोखी कल्पना देशभरातील आणि अगदी परदेशातील साहित्यप्रेमी आणि पर्यटकांना आकर्षित करते, ज्यामुळे गावाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. तसेच मराठी साहित्य आणि संस्कृतीला चालना देण्यात हे गाव महत्त्वाची भूमिका बजावते.