पावसाळ्यात भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील 5 सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळे

गुरूवार, 8 ऑगस्ट 2024 (07:00 IST)
तुम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात फिरायला जाण्याची योजना बनवत अहात का? तसेच अद्भुत सुंदर, निसर्गरम्य ठिकाण शोधात आहात का? महाराष्ट्रामध्ये पावसाचे आनंदमय वातावरण अनुभवण्यासाठी तुम्ही नक्कीच महाराष्ट्रातील या पाच पर्यटन स्थळांना भेट द्या. 

1. कोलाड, रायगड 
कोलाड हे रायगड मध्ये असून एक निसर्गरमय पर्यटन स्थळ आहे. व्हाईटवॉटर राफ्टिंग ही सर्वात प्रसिद्ध क्रिया आहे जी तुम्ही पावसाळ्यात कोलाडच्या पाण्यात करू शकता. ट्रेकिंग, जीप लाइनिंग आणि कॅनोइंग इतर धाडसी क्रिया ज्या धाडसी लोकांना आवडतात. महाराष्ट्रामध्ये pavsala दरम्यान फिरायला जाण्यासाठी सर्वात सुंदर जागा आहे. 
 
जावे कसे?
मुंबई ते कोलाड अंतर 122 किमी आहे. 
पुणे ते कोलाड अंतर 144 किमी आहे. 
 
महाराष्ट्राच्या इतर भागांशी कनेक्टिव्हिटी: कोलाड रेल्वे स्थानक हे कोलाडसाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे आणि मुंबई आणि पुणे येथून रस्ता मार्गाने कोलाड येथे सहज पोहोचता येते.
 
2. दुरशेत, खोपोली
खोपोली मधील दुरशेत सर्व प्रमुख आकर्षण, गरम पाण्याचे झरे, विहंगमय दृश्य, सुरवातीलाच ट्रेक, नाइट प्रवास दुरशेत पश्चिमी घाट मधील बघण्यासारखे पर्यटनस्थळ आहे. शांत विहंगमय निसर्ग शुद्ध अनुभव प्रदान करतो. पावसाळ्यात दुरशेत खोपोली पाहायला नक्कीच जाऊ शकतात.  
 
मुंबई ते दुरशेत अंतर 76 किमी आहे.
पुणे ते दुरशेत अंतर 99 किमी आहे.
 
महाराष्ट्राच्या इतर भागांशी कनेक्टिव्हिटी: दुरशेत जवळील स्टेशन खंडाळा आहे. जे 30 किमी अंतरावर आहे. 
 
3. ठोसेघर धबधबा, कोकण  
पश्चिम भारतातील घाट परिसरात सर्वश्रेष्ठ घाटांची विशालता मध्ये स्थित धबधबे निसर्गाने दिलेली देणगी आहे. ठोसेघर धबधबा महाराष्ट्रातील एक सुंदर धबधबा आहे. येथील नैसर्गिक दृश्य खासकरून पावसाळ्यात पाहण्यासारखे आहे. तसेच निसर्गप्रेमींसाठी खास अनुभव आहे. कोकण पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी एका चांगला पर्याय आहे. 
 
मुंबई ते ठोसेघर धबधबा अंतर 276 किमी आहे.
पुणे ते ठोसेघर धबधबा अंतर 133 किमी आहे.
महाराष्ट्राच्या इतर भागांशी कनेक्टिव्हिटी: सातारा रस्ता मार्गाने या धबधब्यापर्यंत सहज पोहचता येते. 
 
4. आंबोली, सिंधुदुर्ग
आंबोली हायलँड्स एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा स्फूर्तिदायक जलवायु आणि बेधुंद सुंदर वातावरण आंबोलीची हवा, ही जागा पावसाळ्यात आजून सुंदर बनते.घाटांमधील विशाल जंगलांमध्ये विशाल धबधबे पावसाळ्यात सुरु होतात, सिंधुदुर्ग मधील आंबोली हे निसर्गाने दिलेली देणगी आहे. 
 
मुंबई ते आंबोली अंतर 489 किमी आहे. 
पुणे ते आंबोली अंतर 346 किमी आहे. 
महाराष्ट्राच्या इतर भागांशी कनेक्टिव्हिटी: सावंतवाडी रोड, आंबोली जवळील रेल्वेस्टेशन आहे. जे फक्त 30 किमी अंतरावर आहे. 
 
5. हरिहरेश्वर, रायगड  
हरिहरेश्वर पश्चिमी किनारा क्षेत्रामध्ये एक अद्भुत समुद्र किनारा आहे जो स्वर्ग वाटतो. तसेच पावसाळ्यादरम्यान येथील सौंदर्य पाहण्यासारखे असते. भगवान हरिहरेश्वर, ब्रह्मद्रि, पुष्पद्रि आणि हर्षिणाचल नावाने असलेल्या पहाडांनी घेरलेल्या, लोकप्रिय समुद्र किनारा प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या पर्वतांच्या सौंदर्यात भर पडते. 
 
मुंबई ते हरिहरेश्वर अंतर 200 किमी आहे. 
पुणे ते हरिहरेश्वर अंतर 170 किमी आहे. 
 
महाराष्ट्राच्या इतर भागांशी कनेक्टिव्हिटी: माणगांव रेल्वे स्टेशन हरिहरेश्वरच्या जवळची रेल्वे स्टेशन आहे. जे मुख्य शहरापासून 59 किमी दूर आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती