या अॅपच्या माध्यमातून देशातील जनता थेट मोदी सरकारशी जोडली जाणार आहे. जनतेला सरकारच्या निर्णयांमध्ये थेट सहभागी होता येणार आहे. त्यामुळे या अॅपवरील सर्व माहिती, सूचना देशातील सर्व भाषांमध्ये उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. अँड्रॉईडवर सपोर्ट करणाऱ्या या अॅपचं लॉन्चिंग 1 जुलैला दिल्लीत पार पडलेल्या ‘डिजिटल इंडिया वीक’च्या कार्यक्रमात करण्यात आलं होतं.