भारतातील प्रत्येक तीन मातांपैकी एक माता इंटरनेटचा वापर करते. तर चारपैकी केवळ एकच पिता इंटरनेटचा वापर करतो. भारतातील स्त्रियांचे जीवनमान बदलण्यात इंटरनेट महत्वाची भूमिका बजावत आहे. पुरुषांपेक्षा महिलांनी इंटरनेटवर अधिक वेळ खर्च करणे ही खूप मोठी गोष्ट असल्याचे मत गुगलने व्यक्त केले आहे. तसेच हे प्रमाण भविष्यात वाढण्याची शक्यताही वर्तविली आहे.