मिळालेल्या महतीनुसार मंगळवारी क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसचे अपहरण करण्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी दहशतवादी गटाने घेतली. बुधवारी सकाळपर्यंत, किमान १५५ प्रवाशांना वाचवण्यात आले आहे तर सुरक्षा दलांनी सुरू असलेल्या कारवाईत २७ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सर्व प्रवाशांना ट्रेनमधून बाहेर काढेपर्यंत हे सफाई अभियान सुरूच राहील, असे अहवालात म्हटले आहे. तसेच काही अपहरणकर्त्यांना डोंगरात नेण्यात आल्याचे माहिती समोर आली आहे. सुरक्षा दल अंधारात त्यांचा पाठलाग करत होते. बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बीएलएने जाहीर केले आहे की त्यांच्या ताब्यात सध्या २१४ ओलिस आहे आणि त्यांनी किमान ३० सुरक्षा कर्मचारी मारले आहे, परंतु पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अजून या आकडेवारीची पुष्टी केलेली नाही. मंगळवारी, गुडालर आणि पिरू कुनरी या पर्वतीय भागांजवळील मश्काफ बोगद्यातून जात असताना, नऊ बोगद्यांमध्ये ४२५ प्रवाशांना घेऊन जाफर एक्सप्रेसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. ज्या बोगद्यात दहशतवाद्यांनी ट्रेनवर हल्ला केला.