मिळालेल्या माहितीनुसार ८ जून रोजी एक माणूस त्याच्या कुटुंबासह सिराजगंज जिल्ह्यातील कचरीबारी येथे गेला होता. कचरीबारीला रवींद्र कचरीबार किंवा रवींद्र स्मारक संग्रहालय असेही म्हणतात. येथे त्याचा कर्मचाऱ्याशी प्रवेशद्वारावर मोटारसायकल पार्क करण्याच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर त्या व्यक्तीला ऑफिसच्या खोलीत बंद करून मारहाण करण्यात आली. त्यानंतर, या घटनेमुळे स्थानिक लोक संतप्त झाले. लोकांनी प्रथम निषेध केला आणि नंतर जमावाने कचरीबारीच्या सभागृहावर हल्ला केला आणि तोडफोड केली आणि संस्थेच्या संचालकांनाही मारहाण केली. तसेच बांगलादेशच्या पुरातत्व विभागाने सिराजगंज जिल्ह्यातील रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घराच्या तोडफोडीची चौकशी करण्यासाठी ३ सदस्यीय समिती स्थापन केली आहे.