अटल-अडवाणी आरोपी असूनही सन्मान कशासाठी?

मंगळवार, 5 मे 2015 (10:45 IST)
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना पद्मविभूषण सन्मान दिल्याबद्दल एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. बाबरी मशीद पाडण्याच्या कटात सहभागी असलेल्या अटल-अडवाणींना सर्वोच्च पुरस्कार देणार्‍या सरकारकडून आम्ही न्यायाची आशा करूच शकत नाही, असा हल्ला त्यांनी चढवून त्यांनी सरकारविरोधात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचाही हात आहे. 5 डिसेंबरचे त्यांचे भाषण कार्यकर्त्यांना   भडकवणारेच होते. ‘जमीन को समतल करना पडेगा.. बैठनेलायक बनाना पडेंगा..’ या वाक्यांतून त्यांनी हवा तो संदेश कारसेवकांपर्यंत पोहोचवला होता. त्या भाषणाचा व्हिडिओ आजही यू-टय़ुबवर आहे.  

वेबदुनिया वर वाचा