गुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे

गुरूवार, 15 नोव्हेंबर 2018 (11:45 IST)
हिंदू धर्मात प्रत्येक शुभ काम चांगले मुहूर्त बघून केले जातात. भारतीय ज्योतिषीनुसार अशुभ वेळेत करण्यात आलेल्या कामांचे मनाप्रमाणे परिणाम मिळत नाही. हेच कारण आहे की पंचकात शुभ काम करण्यास मनाई असते. पंचकात धनिष्ठा, शतभिषा, उत्तरा भाद्रपद, पूर्वा भाद्रपद व रेवती नक्षत्र येतात. यंदा 15 नोव्हेंबर, गुरुवारी रात्री किमान 08.40 पासून पंचक सुरू होणार आहे, जे 20 नोव्हेंबर, मंगळवारच्या संध्याकाळ 05.15पर्यंत राहणार आहे.  
 
पंचकाचा तुमच्या जीवनावर काय प्रभाव पडतो :
 
पंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे योग निर्माण होतात. पूर्वाभाद्रपद रोग कारक नक्षत्र असतो. उत्तराभाद्रपदांत धनाचा अपव्यय होतो व रेवती नक्षत्रात धनहानी होण्याची शक्यता असते.
 
विद्वानांनुसार पंचक 5 प्रकारचे असतात -
1. रोग पंचक
रविवारी सुरू होणारा पंचक रोग पंचक असतो. याच्या प्रभावामुळे या पाच दिवसांमध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. या पंचकात कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करणे वर्जित असते. शुभ कार्यांमध्ये हे पंचक अशुभ मानले जाते.  
 
2. राज पंचक
सोमवारी सुरू होणार्‍या पंचकाला राज पंचक म्हणतात. हे पंचक शुभ मानले जाते. याच्या प्रभावामुळे या पाच दिवसांमध्ये सरकारी कामांमध्ये यश मिळतो. राज पंचकात संपत्तीशी निगडित कार्य करणे शुभ मानले जाते. 
 
3. अग्नी पंचक
मंगळवारी सुरू होणार्‍या पंचकाला अग्नी पंचक म्हणतात. या पाच दिवसांमध्ये कोर्ट कचेरी निर्णय, आपले हक्क मिळवण्याचे काम केले जातात. या पंचकात अग्नीचा भय असतो. हे अशुभ असते. या पंचकात कुठल्याही प्रकारचे निर्माण कार्य, औजार आणि मशीनरी कामांची सुरुवात करणे अशुभ मानले जाते. यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.  
 
4. चोर पंचक
शुक्रवारी सुरू होणारा पंचक चोर पंचक असतो. ज्योतिषांप्रमाणे या पंचकात प्रवास करण्याची मनाई असते. या पंचकात घेवाण-देवाण,  व्यापार आणि कुठल्याही प्रकारचे सौदे नाही करायला पाहिजे. आणि जर कार्य तुमच्या हाताने केले गेले तर धन हानी होणे निश्चित असते.  
 
5. मृत्यू पंचक
शनिवारी सुरू होणार्‍या पंचकाला मृत्यू पंचक म्हणतात. नावाने ओळखले जाते की अशुभ दिवसापासून सुरू होणारे हे पंचक मृत्यूसमान त्रास देण्यासारखा असतो. या पाच दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचे जोखीमपूर्ण काम नाही करायला पाहिजे. याच्या प्रभावामुळे विवाद, अपघात इत्यादी होण्याचा धोका असतो. 
 
पंचकात हे 5 काम करू नये.. 
 
त्या शिवाय बुधवार आणि गुरुवारी सुरू होणार्‍या पंचकात वर दिलेल्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे नसते. या दोन दिवसांमध्ये सुरू होणार्‍या पंचकात पाच कामांशिवाय इतर कुठले ही शुभ काम करू शकता.  
 
1. पंचकात जेव्हा घनिष्ठा नक्षत्र असेल तेव्हा गवत, लाकूड इत्यादी इंधन एकत्रित नाही करायला पाहिजे, याने अग्नीची भिती असते.  
2. पंचकाच्या दरम्यान दक्षिण दिशेत प्रवास करणे टाळावे, कारण दक्षिण दिशा, यमाची दिशा असते. या नक्षत्रांमध्ये प्रवास करणे धोकादायक ठरू शकते.  
3. पंचकात जेव्हा रेवती नक्षत्र सुरू असेल त्या वेळेस घराची छत नाही टाकायला पाहिजे, असे विद्वानांचे मत आहे. यामुळे धन हानी आणि  घरात क्लेश होतो.  
4. पंचकात पलंग तयार करणे देखील अशुभ मानले जाते. विद्वानांनुसार असे केल्याने फार मोठ्या संकट समोर येण्याची शक्यता आहे.  
5. पंचकात शवाचे अंतिम संस्कार करण्याअगोदर एखाद्या योग्य ब्राह्मणाचा सल्ला घ्यायला पाहिजे. जर असे नाही केले तर शवासोबत पाच पुतळे कणकेचे किंवा कुश (एक प्रकारचे गवत)ने बनवून अर्थीवर ठेवायला पाहिजे आणि या पाचींचे शवाप्रमाणे पूर्ण विधीने अंतिम संस्कार करायला पाहिजे, तेव्हा पंचक दोष समाप्त होतो. असे गरूड पुराणात लिहिले आहे.
 
पंचकात काही शुभ काम केले जातात याची माहिती या प्रकारे आहे- 
 
पंचकात येणारे नक्षत्रांमध्ये शुभ कार्य होऊ शकतात. पंचकात येणारा उत्तराभाद्रपदा नक्षत्र वारासोबत मिळून सर्वार्थसिद्धि योग निर्माण करतो, तसेच धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद व रेवती नक्षत्र प्रवास, व्यापार, जावळ इत्यादी शुभ कार्यांमध्ये श्रेष्ठ मानण्यात आले आहे.  
 
ज्योतिष्यात पंचकाला भले अशुभ मानले गेले आहे, पण या दरम्यान साखरपुडा, लग्न इत्यादी कार्य केले जातात. पंचकात येणारे तीन नक्षत्र पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद व रेवती रविवारी असल्यामुळे आनंद इत्यादी 28 योगांमधून 3 शुभ योग बनवतात, हे शुभ योग या प्रकारे आहे - चर, स्थिर व प्रवर्ध. या शुभ योगांमुळे यश व धन लाभाचा विचार करण्यात येतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती