स्थानिक उच्चवर्णियांच्या वर्चस्व आणि परकीयांचे आक्रमण यामुळे तेराव्या शतकात अनके वर्गाला सोसावे लागले कर्मकांड आणि अनिष्ट प्रथांच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेलेल्या समाजातील अनेक वर्गांना या प्रथांमधून बाहेर पडण्याचा मार्ग संतांनी दाखवला व नामस्मरणाचा मार्ग दाखवला भगवंताच्या नामाचा सोपा पर्याय कर्मकांडांत अडकलेल्या समाजाला दिला. समाजाला सोप्या नामसाधनेचा पर्याय देण्याचा जो प्रयत्न वारकरी संतांनी केला तसेच या मध्ये संत निर्मळा यांचा वाटा मोठा दिसतो. नामसमरणाचे महत्व पटवून देतांना त्या सांगतात की,
संसाराचे कोण कोड । नाही मज त्याची चाड ॥
एका नामेंचि विश्वास । दृढ घालोनिया कांस ॥
जेथे न चले काळसत्ता । विठोबाचे नाम गाता ॥
शास्त्रे-पुराणे वदती । नाम तारक म्हणती ॥
देवाच्या नामसमरणावर विश्वास ठेवा. इतर कर्मकांडांत अडकू नका असे त्यांनी या अभंगातून सांगितले आहे, विठ्ठलाचे नामसमरण आपल्याला संकटातून बाहेर काढते काळाचीही सत्ता विठूमाऊलीचे नाम घेतल्यास चालत नाही कर्मकांडामध्ये समाजाला जखडून ठेवण्यासाठी ज्या व्यवस्था पुराण आणि शास्त्राचा आधार घेत होत्या त्याच्याच आधारे संत निर्मला यांनी कर्मकांडातून समाजाला मुक्त करण्याचे प्रयत्न केले
तसेच संत निर्मला यांनी समाजाला नामसम्रानचे महत्व पटवून देण्याच्या कार्यात त्यांचे मोठे भाऊ संत चोखा मेळा यांनाच गुरुस्थानी मानले। संत चोखा मेळा यांच्याकडूनच नामसाधनेचा सोप्पा मार्ग आपल्याला मिळाला असल्याचे सांगताना त्या म्हणतात की
चोखा म्हणे निर्मळेशी । नाम गाय अहर्निशी ॥
तेणे संसार सुखाचा । इह परलोकी साचा ॥
साधन हेचि थोर असे । शांती क्षमा दया वसे ॥
इतर कर्मठ आणि कठीण साधनाकडे वळण्याऐवजी लोकांनी नामसाधनेकडे वाळवावे विठ्ठल भक्ती करावी. नामस्मरण करावे यामुळे मन शांत राहते दयाळू बनते तसेच संत निर्मला या नामस्मरण महत्व काय आहे हे लोकांना सांगण्याच्या या परंपरेतील पहिला मोती होत्या संत निर्मला यांनी अनेक अभंगरचना केली आहे त्यांचे अभंग आजही समजला शिकवण देतात नामसमरणाचे महत्व पटवून देतात.