नंतर लग्नाची तारीख आणि मुहूर्त काढतात.लग्नाची तारीख काढल्यावर चांगला दिवस बघून वर व वधू पक्षाकडे मुहूर्त वडे घातले जातात. घरात कोणतेही शुभ कार्य असो, मुंज, लग्न, या साठी मुहूर्त वडे घालतात. हे वड़े मुगाची पिवळी डाळ भिजवून त्याला वाटून त्यात हळद घालून बनवले जातात. त्याच बरोबर सुपारी, हळकुंड आणि गवले करण्यासाठी रवा दुधात भिजवून गोळा त्यार करायचा.
सर्वप्रथम पाटावर लाल कापड घालून त्यावर त्यावर तांदूळ घालून सुपारीच्या रुपात गणपतीची स्थापना करून त्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून मुलीकडून किवा मुलाकडून पूजा करवून घ्यायची. गणपतीला हळदी कुंकु, अक्षता,लाल फूल वाहून मनोमने प्रार्थना करायची.
नंतरलग्न मुहूर्त आणि तारीख काढल्यावर निमंत्रण पत्रिका छापण्याचे काम केले जाते. निमंत्रण पत्रिका सर्वप्रथम चांगला मुहूर्त पाहून कुलदेवताला दिली जाते. निमंत्रण पत्रिका देताना तांदूळ आणि त्यात कुंकु मिसळून अक्षता तयार करतात . या अक्षता आणि सुपारी निमंत्रण पत्रिकेसोबत देवापुढे ठेऊन त्यांना लग्नाला येण्याचे आमंत्रण दिले जाते. एकदा देवाला निमंत्रण पत्रिका दिल्यावर दोन्ही पक्षांकडील मंडळी इतर ठिकाणी निमंत्रण पत्रिका वाटप करण्यासाठी जातात.