सद्गुण हे अभ्यासपूर्वक मिळवता येत नाहीत. तुम्हाला गृहित धरावे लागते की, ते आहेतच. गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, ‘‘अर्जुना दु:ख करू नकोस, तू सद्गुणांसोबतच जन्माला आला आहेत’’ ‘जिज्ञासूने हे लक्षात ठेवायला हवे की, तो सद्गुणांबरोबरच जन्मला आहे.’ नाहीतर तो जिज्ञासू होऊच शकला नसता. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यात सद्गुण नाहीत, आणि मग ते मिळविण्याचा प्रयत्न कराल, तर तुम्ही अपयशी व्हाल.