वृद्धावस्थेत बायकोशी विरह
वृद्धावस्थेत भावनात्मक आधाराची जास्त गरज असते. जर या अवस्थेत बायकोने साथ सोडली किंवा ती मुत्यूमुखी पडली तर चाणक्यप्रमाणे हे दुर्दैव आहे. ही नीती बायकांवरपण लागू होते. युवावस्थेत तर हसण्या-खेळण्यात वेळ निघून जातो पण म्हातारपणी एक खर्या साथीदाराची गरज असते. म्हणून म्हातारपणी बायकोचा विरह वाईट असतो.
श्रम आपले फळ दुसर्याच्या पदरी
चाणक्य म्हणतात की जगात काही लोकं खूप लबाड असतात. असे लोकं दुसर्यांचे कामं किंवा त्यांनी कमावलेली संपत्ती आपलीच आहे असे दर्शवतात. ज्याने खरंच कामं केले आहे त्याला श्रेय न मिळता कोणी दुसरेच आपले कौतुक करवून घेतात. चाणक्यप्रमाणे असा व्यक्ती दुर्देवी असतो ज्याला आपल्या कामाचे फळ मिळत नाही.