तुम्ही जितके जागृत आहात त्या प्रमाणात अवतीभवती सार्या गोष्टींकडून तुम्हाला ज्ञान मिळेल. तुम्ही जर का, जागृत नसाल तर मूल्यवान ज्ञानसुद्धा तुम्हाला अर्थहीन वाटते. (अचानक बाहेरून खूप आवाज येऊ लागला आणि किरण खिडकी बंद करायला गेला.)
तुमच्या खिडकी उघडी व बंद करण्याचा क्षमतेवर जागृती अवलंबून असते. जेव्हा बाहेर वादळ असते तेव्हा तुमची खिडकी बंद करावी लागते. नाहीतर तुम्ही ओलेचिंब व्हाल. जेव्हा आत उकाडा आहे आणि गुदमरलसारखे होते, तेव्हा तुम्हाला खिडकी उघडायला लागेल.