या मतदारसंघातून मनसेतर्फे महेश मांजरेकर, आपकडून मयांक गांधी, काँग्रेसकडून गुरुदास कामत आणि शिवसेनेकडून गजानन किर्तीकर अशी चौरंगी लढत होत असतानाच, राखीने संकेत दिल्याने ही निवडणूक अजूनच रंगतदार होणार आहे.
मात्र, राखीला कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार हे अजून स्पष्ट झाले नसून, याबद्दल राखी 29 मार्चला सागंणार आहे. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये चुरशीची लढत बघायला मिळणार आहे.