केजरीवाल म्हणले, नरेंद्र मोदींनी पवित्र गंगा आरतीस अनुपस्थित राहून राजकारण केले आहे. त्यांनी वाराणसीतील जनतेच्या प्रश्नांसंबंधी खुल्या चर्चेस यावे, असे केजरीवाल यांनी खुले आव्हान दिले आहे. भाजपमध्ये आता भीतीची वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भाजपचे अनेक दिग्गज नेते वाराणसीत दाखल झाले आहेत.
दरम्यान, मोदींना निवडणूक आयोगाने एक सभा घेण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मोदींनी गंगा आरतीस अनुपस्थित राहत असल्याचे सांगत, गंगा मातेची माफी मागितली आहे.