बरं या वस्तू दिल्यानेच हा दिवस साजरा करता येतो असेही नाही. काही जण नि:शब्दपणेही हा साजरा करतात. आपल्या मित्र-मैत्रिणीची या दिवशी प्रकर्षाने आठवण आली तरी आपण त्याच्या मैत्रीला जपल्या सारखेच आहे. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेतला बाजारात या दिवशी अनेक शुभेच्छा पत्र आपल्याला पाहायला मिळतील. यात मजकुराची वानवा मुळीच नसते. ‘माझ्याशी मैत्री करशील का’, ते एखादा मित्र नाराज असेल तर ‘सॉरी’ च्या मजकुरापर्यंत सारे काही या शुभेच्छा पत्रात आपल्याला मिळते.