एकदा सूताने ऋषींना विचारले की, 'प्रभू! विष्णूने अलक्ष्मीची उत्पत्ती का आणि कशा प्रकारे केली? हे आम्हाला समजावून सांगा' त्यावर सुत म्हणाले की, विष्णूने जगाला आकर्षित करण्यासाठी आपल्या एका भागापासून श्रेष्ठ पद्या (श्री) आणि दुसर्या भागापासून अशुभ परंतु ज्येष्ठ अलक्ष्मीला उत्पन्न केले. या अलक्ष्मीची उत्पत्ती वेदविरोधी अधर्मीयांना शिक्षा करण्यासाठी केली आहे. तिच्याशी विष्णूने विवाह केला परंतु तिच्या चंचल, अपवित्र आणि द्वेषभावनेमुळे ते दु:खी झाले होते.