महाभारतातील नल दमयंतीच्या कथेतही राजा नलाला त्याच्या नातेवाईकांनी द्यूत खेळण्याचे आव्हान देऊन त्याचे राज्य, संपत्ती, सोनेनाणे, खजिना, राजपाट महाल, सेना सर्व त्याच्याकडून कपटाने जिंकून घेतले होते व नलाला त्याचे साम्राज्य परत मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला असे उल्लेख आहेत. महाभारतातच दुर्योधनाने व त्याचा मामा शकुनीनेही पांडवांना द्यूताचे आवाहन करून त्याचे इंद्रप्रस्थ राज्यच नाही तर पत्नी द्रौपदीही जिंकली होती. त्यानंतर त्यांना १२ वर्षांचा वनवास भोगावा लागला अशी कथा आहे. या द्यूताच्या वेडाने पांडवांचे सारे आयुष्यच बदलून गेले होते.