तिसऱ्या लाटेबाबत सरकारने चेतावणी देताना सांगितले - कोरोनाविरूद्धच्या लढात पुढील 100-125 दिवस महत्त्वपूर्ण आहेत

शनिवार, 17 जुलै 2021 (13:35 IST)
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यता बाबत केंद्र सरकारने शुक्रवारी म्हटले आहे की कोरोनाविरूद्धच्या युद्धात पुढील 100-125 दिवस महत्त्वपूर्णअसणार आहेत.नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ.व्हीके पॉल यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, देशातील लोकसंख्येचा एक मोठा भाग अद्याप कोरोना संक्रमणास बळी पडला आहे. म्हणूनच तिसऱ्या लाटेबद्दल वारंवार शंका व्यक्त केल्या जातात. ते म्हणाले की जगात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे आणि दररोज ते पाच लाखाहून अधिक प्रकरण झाले आहे. 
 
ते पुढे म्हणाले की, डब्ल्यूएचओने या आकडेवारीच्या आधारे परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे म्हटले आहे. ही तिसरी लाट येण्याची चिन्हे दर्शवित आहे. ते म्हणाले की जर लोक कोरोना च्या प्रोटोकॉल चे पालन आणि आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली तर तिसरी लहर येणार नाही. किंवा त्याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. डॉ. पॉल म्हणाले की, पुढील 100-125 दिवस या संदर्भात महत्वपूर्ण असतील. म्हणजेच, पुढील चार महिने विशेषतः काळजी घेणे आवश्यक आहे.
 
वास्तविक, सरकारने डिसेंबरपर्यंत 94 कोटी प्रौढ लोक लसीकरण करण्याचे लक्ष्यही ठेवले आहे. परंतु 94 कोटी लोकसंख्येपैकी 70-80 टक्के लोक लस घेण्यात यशस्वी ठरले तरीही कोरोनाचा मोठा धोका टाळता येईल. म्हणूनच, पुढील चार-पाच महिने या दृष्टीने देखील खूप महत्त्वपूर्ण असतील, कारण या काळात सरकारने लसीकरणाची गती वाढवावी लागेल.देशात आतापर्यंत लसीचे 41 कोटी डोस दिले गेले आहेत आणि दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची संख्या जवळपास 7.5 कोटी आहे.
 
मोडेर्नाच्या लसबाबत लवकरच निर्णयः
 
पॉल म्हणाले की मोडर्नाच्या लस संदर्भात चर्चा सुरू आहे आणि कोणत्याही वेळी निर्णय घेण्यात येईल.ते म्हणाले की,लसीची कमतरता दूर करण्यासाठी उत्पादन वाढविण्यासाठीही उपाययोजना केल्या जात आहेत.
 
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने शुक्रवारी लोकांना फेस मास्क घालण्याचे आवाहन केले.ते म्हणाले की आपण आता आपल्या जीवनात या गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत कारण आता हे सामान्य झाले आहे.पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले, लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यासह फेस मास्कचा वापरात अंदाजे घट झाली असल्याचे एका विश्लेषणावरून दिसून आले आहे.आपल्या रोजच्या जीवनात आपण फेस मास्कचा समावेश केला पाहिजे.त्याच प्रमाणे सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे तसेच सेनेटाईझरचा वापर देखील करावा.या गोष्टी नियमितपणे पणे दैनंदिनी जीवनात समाविष्ट करणे आवश्यक आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती