कपिल शर्माच्या कॅनडा स्थित 'कॅप्स कॅफे'वर जुलैमध्ये आणि दुसऱ्यांदा ऑगस्टमध्ये गोळीबार झाला होता. दिवाळीपूर्वी कपिलच्या कॅफेवर गोळीबार होण्याची ही तिसरी वेळ आहे. कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती; तिसऱ्या हल्ल्याचीही जबाबदारी याच टोळीने घेतली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींना धमक्या दिल्याबद्दल ही टोळी चर्चेत आहे.