बाप्परे, डॉक्टरांचा हलगर्जीपणा, महिला दगावली

शनिवार, 3 ऑगस्ट 2019 (09:34 IST)
औरंगाबादमधील गंगापुरच्या शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका २० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तनुश्री तुपे असे या मृत महिलेचे नाव आहे. प्रसुतीदरम्यान शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांकडून कापसाचा बोळा तनुश्रीच्या पोटातच राहिला. यानंतर तनुश्रीची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला.
 
तनुश्री तुपे २२ जुलै रोजी प्रसुतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. २३ जुलै रोजी सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यानंतर तनुश्रीने बाळाला जन्म दिला. यानंतर तिला रुग्णालयातून घरीही सोडण्यात आले. मात्र, दोन दिवसानंतर तिला उलट्या, मळमळ यासह असह्य वेदना सुरु झाल्या. त्यामुळे तनुश्रीला पुन्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी करून तनुश्रीला घाटी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. याठिकाणी उपचारादरम्यान २७ जुलै रोजी तनुश्रीचा मृत्यू झाला. यानंतर शवविच्छेदन अहवालात तनुश्रीच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट झाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती