शरद पवार यांच्या पत्राची दखल केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी घेतली

गुरूवार, 20 मे 2021 (07:37 IST)
रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावे, केंद्रीय खत व रसायन मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना या प्रकरणी वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे आणि किमतीतील वाढ लवकरात लवकर मागे घ्यावी अशी विनंती राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पत्राद्वारे केली होती. शरद पवार यांच्या पत्राची दखल केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी घेतली आहे. वाढत्या खतांच्या दरांवर पुनर्विचार करण्यात येईल असे आश्वासन सदानंद गौडा यांनी दिले आहे. शरद पवार यांनी मंगळवारी पत्र लिहिले होते यानंतर गौडा यांनी गुरुवारी शरद पवार यांना फोन करुन खतांच्या दरवाढीवर सविस्तर चर्चा केली आहे.
 
रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकऱ्यांची अडचणी वाढत आहेत. यामुळे खतांच्या दरवाढीवरुन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहिले होते. या पत्रात शरद पवारांनी म्हटले आहे की, कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळेअधीच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खतांच्या वाढीव किंमती शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नाहीत. खतांच्या दर आटोक्यात आणा अशी मागणी शरद पवार यांनी केली होती. यावर सदानंद गौडा यांनी पुनर्विचार करु असे म्हटले आहे.
 
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्राची दखल घेत केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांनी शरद पवारांना फोन केला होता. फोनवर दरवाढीवर सविस्तर चर्च करुन खतांच्या किंमतीवर पुनर्विचार करु असे आश्वासन दिले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती