रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (10:17 IST)
रायगड पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या मुंबई येथील घरातून अटक केली आहे. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 
 
कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. शिवाय अर्णब यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
 
५ मे २०१८ रोजी वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती