मुंबईकरांना मधुमेहाने ग्रासले, दररोज सरासरी २६ मुंबईकरांचा मृत्यू

बुधवार, 18 सप्टेंबर 2019 (16:38 IST)
मुंबईत दररोज सरासरी २६ मुंबईकरांचा मधुमेहाने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईकरांचे आरोग्य बिघडत चालल्याचे हे लक्षण आहे. मुंबईतील आरोग्य यंत्रणेचे भीषण वास्तव प्रजा फाऊंडेशने उघड केले आहे.
 
त्या खालोखाल टीबीसारख्या संसर्गजन्य आजाराने दररोज पंधरा मुंबईकरांचा मृत्यू होत असल्याचीही माहिती समोर आली आहे. मुंबई शहरात ४० हजार नागरिकांमागे एक रुग्णालय आहे. तर पश्चिम उपनगरात ८६ हजार तर पूर्व उपनगरात ७२ हजार लोकांमागे एक रुग्णालय आहे.  
 
मुंबई महापालिकेचे रुग्णालयांकडे दुर्लक्ष असल्याचे प्रजा फाऊंडेशनने आपल्या अहवालात नमूद केले आहे. महापालिकेच्या दर एका दवाखान्यात सरासरी केवळ एकच कर्मचारी नियुक्त आहे. २०१८ मध्ये पालिकेच्या दवाखान्यांकरता संमत करण्यात आलेल्या पदकांच्या तुलनेत १९ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती