अकबर-बिरबल कथा - तू तर कमालच केलीस!

बिरबलाचा दरबारात जाण्याचा तो पहिलाच दिवस होता. दरबाराचे थोडे-फार काम झाल्यावर बादशाहाने बिरबलाला विचारले, '' बिरबल, तुमच्या हिंदू लोकांची दिवाळी जितक्या आनंदाने येते, तितक्याच आनंदाने ती निघून जाते का?''
बिरबल : होय महाराज. 
बादशाहा : कशावरून म्हणतोस ? 
बिरबल : आणि म्हणून तर ती पुढील वर्षी न चुकता अगदी वेळेवर येते ना ? जर ती आनंदाने गेली नसती, तर ती पुन्हा परत आली असती का? 
बादशाहा : वा रे पठ्ठे ! बिरबल, तू तर कमालच केलीस. 

वेबदुनिया वर वाचा