राज्यपालांनी ३० एप्रिलपर्यंत भेटी रद्द केल्या

बुधवार, 1 एप्रिल 2020 (07:33 IST)
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात येणाऱ्या लोकांच्या भेटी ३० एप्रिलपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता महिनाभर राजभवनात येऊन कुणालाही राज्यपालांची भेट घेता येणार नाही.

ज्यांनी भेटीचे आरक्षण केले आहे, त्यांना कालांतराने राजभवनाला भेट देता येईल, असे ट्विट राजभवनाच्या हँडलवरून करण्यात आले आहे. 

राजभवन भेटीची योजना आता दि. ३० एप्रिल २०२० पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यासाठी ज्या लोकांनी राजभवनाच्या संकेतस्थळावर राजभवन भेटीचे आरक्षण केले आहे, त्यांना कालांतराने राजभवनाला भेट देता येईल, व त्याप्रमाणे त्यांना स्वतंत्रपणे सूचित केले जाईल.

— Governor of Maharashtra (@maha_governor) March 31, 2020

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती