पंतप्रधानांनी त्यांच्या कठोर निर्णयांबद्दल देशवासीयांची माफी मागितली

रविवार, 29 मार्च 2020 (12:48 IST)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले यामुळे मी देशवासियांची माफी मागतो. परंतु कठोर निर्णय घेणं ही, सध्या काळाची गरज आहे.’

दरम्यान, भारतात आतापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा एक हजारांवर पोहोचला आहे. तर देशात कोरोनामुळे 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात असून महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.

Tune in tomorrow at 11.

Tomorrow’s episode will be focused on the situation prevailing due to COVID-19. #MannKiBaat pic.twitter.com/wWybvdLW8k

— Narendra Modi (@narendramodi) March 28, 2020

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती