TET: महाराष्ट्रातील 40 हजाराहून अधिक शिक्षकांना दिलासा

सोमवार, 14 जून 2021 (14:17 IST)
नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन (एनसीटीई) ने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) चे प्रमाणपत्र आजीवन वैध असल्याचे आदेश दिले आहेत. एनसीईटीने सर्व राज्यांना राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या प्रमाणपत्र घेण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले आहे. याचा फायदा घेत महाराष्ट्रातील 40,000 शिक्षकांना सात वर्षांची वैधता कालबाह्य होत असल्याने नवीन शिक्षक पात्रतेचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
 
एनसीटीईने टीईटी पास शिक्षकांना आजीवन वैधता देण्याचा निर्णयही घेतला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, राज्यात टीईटी परीक्षा घेणार्‍या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे म्हणतात की आम्ही टीईटीची वैधता वाढविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. आम्ही पुन्हा उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांवरही काम करत आहोत.
 
आतापर्यंत सीटीईटी आणि टीईटी प्रमाणपत्रांची वैधता केवळ सात वर्षांसाठी होती. शिक्षक होण्यासाठी सात वर्षांनंतर तरुणांना पुन्हा सीटीईटी किंवा टीईटी परीक्षेला हजर राहावं लागत होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती