मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्लयातील मृतांना आणि नागरिकांना वाचविण्यासाठी प्राणाची आहुती देणार्या हुतात्म्यांना मी श्रध्दांजली वाहतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयावरुन आपली भावना व्यक्त केली.
२६/११च्या दहशतवादी हल्लयाला आज सहा वर्षे पुर्ण होत आहेत. पंतप्रधनांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी आपण सर्व कटिबध्द आहोत. प्राणाची आहुती देणाºया हुतात्म्येच ‘रिअल हिरो’ आहेत.