कृषक एक्सप्रेस वाराणसीहून गोरखपूरमार्गे गोंडाला जाते होती तर बरौनी एक्सप्रेस लखनऊहून गोरखपूरमार्गे बरौनी जात असताना दोन्ही गाड्यांची समोरासमोर भीषण धडक झाली. बरौनी एक्सप्रेसचे पाच डबे रुळावरून घसरले. या अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला असून 45 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अपघात भीषण असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भितीही वर्तवली जात आहे.