'एक्साइज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईमुळे होते आहे नुकसान...', पुणे पोर्श प्रकरणानंतर घेतलेल्या एक्शनवर बोललेले पब आणि बार मालक

बुधवार, 29 मे 2024 (10:07 IST)
पुणे पोर्श कार केस नंतर एक्साइज विभाग आणि महाराष्ट्र पोलिसांनी पब आणि बार विरुद्ध एक्शन घेतली आहे. पोलिसांच्या सततच्या कारवाईला घेऊन पब आणि बार च्या मालकांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अबकारी विभाग आणि पोलिस यांच्या कारवाईमुळे पब आणि बारचे नुकसान आर्थिक रूपाने नुकसान होते आहे. 
 
महाराष्ट्रातील पुण्यामध्ये पोर्श कार अपघात केस नंतर मुंबई पोलिसांनी बार आणि पब यांच्या शोध घेऊन कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी रविवारी आणि सोमवारी 50 ठिकाणी छापे मारले. तर पाच बार विरुद्ध कारवाई केली. तर एक्साइज विभाग आणि पोलीस यांच्या सततच्या कारवाईवर बार आणि पब मालकांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते आहे. 
 
मुंबई पोलिसांनी पुण्यामधील झालेल्या अपघाताला गंभीरपणे घेतले आहे. कारण या अपघातामध्ये एका अल्पवयीन आरोपीने नशेमध्ये दोन जणांना चिरडले. यानंतर पोलिसांनी बेकायदेशीर पब आणि बार वर कठोर कारवाई सुरु केली आहे. यानंतर पब आणि बार मालकांचे म्हणणे आहे की या सर्व सुरु असणाऱ्या कारवाईनमुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते आहे. 
 
पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये एका पब मालक म्हणाले की, पुण्यामध्ये जी दुर्घटना घडली ती वाईट आहे. मी हॉटेल आणि रेस्टोरंट उद्योगाच्या दृष्टीने हे सांगू इच्छित आहे की, पोलीस आणि एक्साइज अथॉरिटी यांनी कायद्याच्या रूपाने स्थापित प्रतिष्ठान वर कारवाई करायला नको. तसेच आम्ही आमच्या बाजूने हे देखील सांगत आहे की, आम्ही सुनिश्चित करू की या उद्योगाच्या अधिकारीनव्दारा निर्धारित सर्व नियम आणि आदेशांचे पालन करू. व प्रार्थना करू की, पुढील येणाऱ्या वेळेत अशी घटना घडणार नाही. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती