नऊ महिने पोटात गर्भ वाढविण्यार्या महिला अर्भकास जन्म देतातच असे नाही. काही महिलांचा गर्भ या नऊ महिन्यांच्या काळात आपोआपच गळून पडत असतो, त्यालाच 'नैसर्गिक गर्भपात' असे म्हणतात. मात्र काही महिला पाळणा लांबविण्यासाठी नर्सीग होममध्ये जाऊन गर्भपात करत असतात. त्याला तांत्रिक गर्भपात असे म्हणले जाते.
गर्भपात हा गर्भधारणा झाल्यापासून साधारण 26 आठवड्यांपूर्वी होतात. परंतु काही महिलांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने काही वेळा तर गर्भ शस्त्रक्रिया करून नष्ट करावा लागत असतो.
गर्भपाताचे प्रमाण जर आपण पाहिले तर प्रत्येक शंभर गरोधर स्त्रियांमागे दहा ते वीस स्त्रियांचा गर्भपात होत असतो.
गर्भाला इजा होणे, फलीत बीजांडामध्ये उणीवा असणे. गरोदर स्त्रीला मलेरिया, काविळ सारखा गंभीर आजार, गुप्त आजार, पोटावर जोरात पडणे, प्रजोत्पादक अवयवांमध्ये काही समस्या असेल तर गर्भपात (मिसकॅरेज) होवू शकतो. जर गर्भपात झाला नाही तर अशा अंडाणुची वाढ होवून त्यांचा विकास होतो व परिणामी गंभीर विकृति असलेले बाळ जन्माला येते.
गर्भपाताची लक्षणे- गर्भपाताची दोन मुख्य लक्षणे असतात. त्यातील पहिला म्हणजे योनिमार्गातून रक्तस्त्राव व दुसरा ओटीपोटात दुखणे होय. गर्भपात होण्यापूर्वी स्त्रीला अंगावर वाहते. सुरवातीला कमी रक्तस्त्राव होतो. परंतु काही वेळातच त्याचे प्रमाण अचानक जास्त होते. रक्तात मोठ्या गाठी दिसून येतात. गर्भपात व मासिक पाळी येण्यापूर्वी होणारा त्रास यात थोड्या फार प्रमाणात साम्य असते.
गर्भपातापूर्वी कोणती काळजी घ्याल? सगळ्यात आधी गर्भपाताशी संबंधीत धोके लक्षात घेणे. गर्भ कमी दिवसाचा असेल तर त्यापासून संबंधीत महिलेला धोकाही कमी असतो. मात्र जास्त दिवसांचा गर्भ पाडण्यात जास्त धोका असतो. गर्भपाताची लक्षणे जाणवू लागल्यास गर्भपाताची योग्य पध्दत निवडणे, आवश्यक असते. परिस्थिती हाताबाहेर जाण्या अगोदरच निर्णय घ्यावा लागतो. अन्यथा संबंधीत महिलेल्या जीवाला धोका निर्माण होत असतो.
तात्काळ निर्णय घेऊन आरोग्य सेवा केंद्र अधवा सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावीत. शारीरिक तपासणीच्या दरम्यान, आरोग्य कर्मचार्याने गर्भाशयाची स्थितिदेखील पहायला हवी आणि लैंगिक संबंधातून पसरणारे आजार, मलेरिया व कावीळ सारखे आजार त्या महिलेला आहेत की, नाही याची ही तपासणी करणे गरजेचे आहे. त्यासोबत अल्ट्रासाउंड स्कॅनिंग चाचणी ही करून घेतली पाहिजे.