प्रेमसंबंध निर्माण करणे हे जितके सोपे आहे, तितकेच ते टिकवणे अवघड आहे. बहुतांश युवक-युवतींना प्रेमसंबंध बनवता येऊ शकतात, मात्र ते टिकवताना त्यांनी घबराट उडते. या भीतीचे मूळ त्यांच्या पालनपोषणात असू शकते. ज्यांना आपल्या लहानपणी आईवडिलांचा सहवास अधिक लाभलेला नसतो त्यांच्या बाबतीत अशी समस्या निर्माण होऊ शकते, असे इस्त्रायलच्या संशोधकांनी म्हटले आहे.
अशी मुलं तरुणपणी कोणतेही वचन किंवा 'कमिटमेंट' करण्यास कचरतात. तेल अवीव युनिर्व्हसिटीमधील बॉब शॅपल स्कूल ऑफ सोशल वर्कचे मनोवैज्ञानिक शेरॉन डेकेल यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, मुलांकडे पुरेसे लक्ष देऊन त्यांच्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करणे हे दोन्ही हानीकारकच आहे, असा अनुभव आलेल्या मुलांना तरुणपणी अनेक समस्यांचे सामना करावा लागू शकतो. संशोधकांनी 22 ते 28 वर्षे वयोगटातील 58 जणांची पाहणी करून याबाबतचे निष्कर्ष काढले आहेत.