वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा संघ किंग्ज इलेवन पंजाबकडून पराभूत झाला असेल, पण मुंबईचा फलंदाज हरभजनने केलेल्या तुफानी फलंदाजीमुळे मुंबई क्रिकेट रसिकांची मने जिंकली. सामना संपल्यानंतर सेहवागने, आज भज्जी पागल झाला होता. आम्हाला वाटले हे 10, 20, 30 धावांपर्यंत चालेल मात्र त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली. अशी मनोरंजक प्रतिक्रिया दिली. मुंबईकडून खेळणार्या हरभजनने केवळ 24 चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 64 धावा ठोकल्या, मात्र हरभजनची ही स्फोटक खेळी मुंबई इंडियन्सला विजयापर्यंत नेऊ शकली नाही.