होय मी वटवृक्ष बोलतोय...

MH GOVT
होय मी वटवृक्ष बोलतोय... अहो खरचं मी वटवृक्षच बोलतोय....! पूनवेच्या चंद्राच्या शीतलछायेत...एकटाच आडरस्त्याच्या कडेला उभा....आमच्यातला इथे उरलेला मीच एकटा....! हा पण ही निरव शांतता, चांदण्या असतात माझ्या सोबतीला....पण...जाणवतेच ना कमी आपल्या माणसांची.....! इतके दिवस मी आपला स्वत:ला सांभाळत... सगळं सहन करत शांत गप्प उभा होतो. माझ्या स्तित्त्वाबद्दलही शंका यावी इतका दुर्लक्षित होतो. पण आज... आजचा...दिवसच काही निराळा होता...सवाष्णी मिहला नटून थटून आपला रोजचा सवयीचा रस्ता सोडून मला भेटायला आल्या खास....त्या रंगलेल्या गप्पा...त्यांची ती बडबड... किती छान वाटलं सांगू....! त्या आवाजांनी सारा परिसरच जणू भारून गेलेला. अन् दिवस कसा मावळला तेच कळलं नाही.. आणि मग मनात एक विचार आला, हृदयातील पानं सळसळली...बोलावं का आपण सगळं मनातलं... सांगावी का ती आपली होणारी चीडचीड, कधी कधी झालेला मनस्ताप...एकटेपणाची भिती...इतके दिवस मनात दडवलेलं सारं काही... मनातलं सारं सारं बोलू, थोडं मोकळ होऊ...

हं! आता मी वड बोलतोय म्हटल्यावर तुम्हाला नक्कीच आठवल्या असतील भूता-खेतांच्या गोष्टी, माझ्या पारंब्यांवर मध्यरात्री लटकणार्‍या, कोणा-कोणाला अमावस्येला दिसणार्‍या...घाबरवणार्‍या भूता-खेतांच्या गोष्टी....तुम्ही माणसं माझ्यापासनू दुरावत गेलात अन् मग ही ‘भूत’च माझ्या वाटयाला आली...पण आजज्या ह्या एका दिवसाने मला पुन्हा तुम्हा माणसात आणले..आज माझी यथासांग पूजा झाली. फळांचा नैवेद्य दाखविला गेला. पवित्र अशा सूताच्या धाग्याने प्रदक्षिणा घालत बंधनात बांधले.. हे सर्व प्रेम, हा आदर, मला पूजण्याचा मान माझ्या पदरात पडलाय तो सावित्रीमुळेच. आज वटपौर्णिमा अन् म्हणूनच वटसावित्रीचं व्रत. या व्रताने माझी, निसर्गाशी अन् माणसाशी जोडली गेलेली नाळ अधिकच घट्‍ट होते. ज्या सावित्रीने ही नाळ जोडली ती सावित्री तर तुम्हाला माहितीच असेल ना...!

ती... सत्यवानाची सावित्री....! जिने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले ती... थोडं थोडं माहितीयं, ठिक आहे मी सांगतो ती कहाणी... सावित्री, मद्रदेशाचा राजा अश्वपती याची कन्या. सावित्रीने पती म्हणून सत्यवानाची निवड केली होती. सत्यवानाचे वडील द्युमत्सेन हे वृद्ध आणि अंध होते. त्यांचे राज्य शत्रूने घेतले होते. त्यामुळे सत्यवानाला आपल्या पित्याबरोबर वनवास प्राप्त झाला होता. ‘सत्यवान अल्पायुषी आहे, लग्नानंतर बरोबर एक वषाने त्याचा मृत्यू होणार आहे’ हे नारदमुनींकडून कळल्यानंतरही सावित्रीचा सत्यवानाशीच विवाह करण्याचा निश्चय पक्का होता. ‘काहीही असले तरी मी सत्यवानाशीच विवाह’, हा तिचा सकंल्प पाहून अश्वपती राजाने सावित्रीचा विवाह सत्यवानाशीच लावून दिला. वृद्ध सासुसासरे यांची ती मनोभावे सेवा करी. आपल्या सतत कष्टांनी आणि प्रेमळ वागणुकीने ती सत्यवानालाही अत्यंत प्रिय झाली.

MH GOVT
सावित्रीला वनात राहून तिथल्या औषधी वनस्पती, कंदमुळे यांची चांगलीच जाण झाली होती. वनवासातील गोड सहवासात वर्ष संपत आले, सावित्रीला नारदांच्या त्या भविष्यवाणीची आठवण होतीच म्हणून तिने खडतर व्रत केले, उपवास केले. रात्रंदिवस परमेश्वराची प्राथर्ना केली, त्रिरात व्रत केले. एके दिवशी सत्यवानाबरोबर सावित्रीही वनात गेली. त्या दोघांनी कंदमुळे जमवली. सिमधांसाठी लाकडे तोडण्यास सत्यवान माझ्या फांद्यांवर चढला. फांदीवर कुर्‍हाड चालवू लागला. पण त्या नादात तो धडकन खाली पडला आणि गतप्राण झाला. ते पाहून सावित्रीही बेशुद्ध पडली. तिच्या आत्म्याला पतीची प्राणज्योत स्पष्ट दिसत होती. ती साध्वी पतिव्रता होती. व्रतांच्या पुण्याईमुळे तिला ते सर्व दृश्य दिसत होते. ती सत्यवानाच्या प्राणज्योतीच्या मागोमाग जाऊ लागली. तेव्हा यमराज म्हणाले, ‘बाळ, तुला या सत्यवानाच्या प्राणाबरोबर स्वगार्त येता येणार नाही; मागे फिर आणि त्यांच्या देहाचे अंत्यसंस्कार कर’. पतीच्या प्राणासाठी तिने यमराजांकडे खूप आर्जव केले. ते पाहून यमराज म्हणाले, “मुली, तुझ्या पतीनिष्ठेबद्दल मला आदर आहे पण तू पतीशिवाय अन्य मागणी माग. मी तो तुझा हट्ट अवश्य पुरवीन”. मग सावित्रीने आपल्या सासर्‍याला दृष्टी मागितली त्यांचे गेलेले राज्य परत मागितले. आपल्या पित्याला पुत्र मागितले आणि शेवटी आपणही पुत्रवती व्हावे, असा आशीवार्द यमाजवळ मागितला.सावित्रीच्या विनयशील आणि मधुर बोलण्यावर यमराज प्रसन्न झाले.


MH GOVT
पती‍शिवाय तिच्या त्या अन्य मागण्या त्यांनी भराभर कबूल केल्या आणि शेवटी तिला, “पुत्रवती भव”असा आशीवार्द देऊन यमराज फसले. सावित्रीने मोठ्या खुबीने सत्यवानाचे प्राण परत मिळविले. ह्या सर्व घटना माझ्याच समोर झाल्या. त्यानंतर सावित्रीने सर्व सुवासिनी स्त्रियांसह माझी ‘सौभाग्यदायी वटवृक्ष’ म्हणून मोठ्या भक्ती भावाने पूजा केली. तिने सुरू के लेली ही प्रथा दर साल सर्वत्र चालू आहे. सावित्री ही अखंड पतिव्रतांची प्रतिक ठरली. त्या सतीची आठवण करून आपलेही सौभाग्य अखंड रहावे म्हणून सुवासिनी स्त्रियां वटपौर्णिमेच्या दिवशी ‘वटसावित्री’ व्रत करतात.

वटपौर्णिमा, वाप्रमाणेच सर्व ज्येष्ठ वैशिष्ट्‍ये धारण करणार्‍या ज्येष्ठ मिहन्यात येते. ऋतूचक्रातील सर्वांत मोठा दिवस याच महिन्यात असतो. हा मिहना तसा गंभीर, शांत आणि संथही. ग्रीष्मात होरपळलेला दिवस, वातावरणात वाढलेला उष्मा आणि मध्येच पावसाची हलकी शी सर...! ऊन आणि पावसाळ्याचं'फ्यूजन' म्हणजे हा मिहना. निरोप घेणारा उन्हाळा नि सुरू होणारा पावसाळा यांची गळाभेट या मिहन्यात पाहता येते. अशा या स्वप्नील वातावरणाला येणारी पौर्णिमा जणू सृष्टीच नवं रुपचं... सवाष्णी मिहला ज्येष्ठ त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत त्रिरात्र उपवास करतात. तीन रात्र शक्य नसल्यास पौर्णिमेलाच उपवास करतात. त्या दिवशी सुवासिनी स्नान करून माझी पूजा करतात. सातही जन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. मला पाणी घालून माझ्याभोवती सूत गुंडाळत प्रदक्षिणा घालतात. मला आंबे, केळी, फणस अशा फळांचा नैवेद्य दाखवतात. प्रदक्षिणा घालताना सातही जन्म हयाच पतीची साथ लाभावी, अखंड सौभाग्य राहावे, अशी प्रार्थना करतात. स्त्री आणि भूमी यामधील सामर्थ्याकडे वटपौर्णिमेने लक्ष वेधले आहे. स्त्री मानवाला जन्म देते तर भूमी वनस्पतीला. म्हणूनच सुफलीकरणाच्या विधीमध्ये स्त्री महत्त्वपूर्ण ठरते. या अनुषंगाने वटपूजा ही प्रामुख्याने विवाहित स्त्रियांनी करायची असते. ‘रूजवावे, फुलवावे आणि जे फुललेले आहे ते राखावे’ असा सजर्नतेचा आदिबंध वटपौर्णिमेच्या दिवशी घट्ट होतो.

ंsss ! बघा काय जमतयं ते..... माझा अस्तित्त्वाचा लढा तर चालूच राहणार आहे. कितीही संख्येने कमी असलो तरी माझं दायित्व मी निभावणारच... आम्हाला ओसाड करुन तुमचं जीवन प्रगती करेलही काही काळ... पण ते समृद्ध होणार नाही... होऊ शकणार नाही...

मनापासनू जे वाटलं भावलं, बोलावसं वाटलं ते बोललो. उत्तरात्र केव्हाच उलटून गेलीय. सुयर्देव आता सहस सहस्त्रकिरणांवर स्वार होऊन नव्या प्रवासाची सुरुवात करेल. नवा दिवस, ‘नवजीवन’ पुन्हा उदयास येईल. येणारा नवा दिवस ‘मला संजीवनी देण्याचा’ संकल्प तुमच्या हृदयी रूजवो...या आशेसह मी तुमच्याच परंपरेने जपलेला “वटवृक्ष”.... विश्रांत होतो... थांबतो... पूर्णविराम.

वेबदुनिया वर वाचा