राजेश खन्नाचे पांच सर्वश्रेष्ठ चित्रपट

राजेश खन्नाने कित्येक चित्रपटात कसदार अभिनय केला आहे. संवादफेक, लकबी आणि अभिनयाने त्यांनी लाखोंच्या हृदयात घर केले. म्हणून सर्वश्रेष्ठ पांच चित्रपट निवडणे महत्कठिण आहे.

आनंद (१९७१)


PR
PR
''बाबू मोशाय, हम सब रंगमंच की कठपुतलियां है जिसकी डोर उपर वाले के हाथ में है, कौन कब कहां उठेगा कोई नयी जानता''. आनंद चित्रपटाने जिंदादिलीची नवीन व्याख्या लिहिली. राजेश खन्न विषयी बोलणे आनंद शिवाय अपूर्ण आहे. ते किती कसदार अभिनेते होते, हे सांगण्यासाठी आनंद हा एकच चित्रपट पुरेसा आहे.

ऋषिकेश मुखर्जींच्या या क्लासिक चित्रपटात त्यांनी रंगवलेली कँसरग्रस्त तरूणाची भूमिका भावी पिढीतल्या कलाकारांसाठी उदहारण बनली आहे. या चित्रपटात आजाराच्या शेवटच्या स्टेज मध्ये असलेल्या आनंद सहगलची भेट भास्कर बॅनजीँ (अमिताभ बच्चन) सोबत होते. आनंदला भेटल्यानंतर भास्करला जीवनाचे नवीन दर्शन घडते आणि आनंदच्या मृत्यनंतर शेवटी तो उद्गारतो की, 'आनंद मरा नही, आनंद मरते नही'.

जिंदगी कैसी है पहेली हाय... गाण्यातून प्रेक्षकांना त्याच्या अंतकरणातील दुखाचे दर्शन घडते. पुढच्याच क्षणास तो एका अनोळखी व्यक्तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, ''कैसे हो मुरारी लाल, पहचाना की नही''. आनंदच्या पात्रातील विविधांगी पदर राजेश खन्ना जसा जगला त्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले.

आनंद ने शिकवले की मृत्यू तर येणारच, मात्र आपण जगणे सोडू शकत नाही. आयुष्य लांब नाही मोठे असायला पाहिजे. आयुष्यात जीतके दिवस जगाल, आनंदाने जगा. हा आनंद आज आपल्यात नाही मात्र त्याने रंगवलेले पात्र अमर्त्य राहिल.

आराधना (१९६९)

PR
PR
आराधना राजेश खन्नाच्या कारकीर्दीतील पहिला सुपरहिट चित्रपट आहे. या चित्रपटाने त्यांना रातोरात सुपरस्टार बनवले होते. राजेशने रूपेरी पडद्यावर रोमांसला दिलेल्या अभिव्यक्तिने तरूण पीढी अक्षरश: दिवानी झाली.

एअरफोर्स ऑफिसर अरूण वर्मा आणि सूरजच्या दुहेरी भूमिका त्यांनी अशा निभावल्या की प्रेक्षक दंग राहिले. या व्यावसायिक चित्रपटात भरपूर मनोरंज आहे. प्रणय, खुशी, दु:ख, सदाबहार गाणी आणि राजेश-शर्मिलाचा कसदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटाने तिकीट खिडकीवर धूम घातली.

मेरे सपनो की रानी गाण्याच्या चित्रिकरणात आजही तितकाच ताजेपणा जाणवतो. राजेश जीप मध्ये बसून ट्रेन मध्ये बसलेल्या शर्मिलासाठी हे गाणे गातो. राजेश सोबत कित्येक चित्रपटात काम करणार्‍या शर्मिलाच्या मते आराधनातील भूमिका इतर कुणीही राजेशपेक्षा चांगली निभाऊ शकला नसता.

नमक हराम (१९७३)

PR
PR
राजेश खन्ना व अमिताभ बच्चनचा आणखी एक सोबतचा चित्रपट. ही दोन मित्रांची कहानी असून एक गरीब तर एक श्रीमंत असते. भांडवलशाही विरूद्ध मजूर या वर्गसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन मित्रांची कहाणी यात बेतण्यात आली आहे.

राजेशने सोनू नावाच्या गरीब मित्राची भूमिका इतक्या प्रभाविपणे रेखाटली की चित्रपट संपल्यानंतर फक्त त्यांचा अभिनयच लक्षात राहतो. ऋषिकेश मुखर्जींनी आनंद नंतर राजेश सोबत 'नमक हराम'च्या रूपाने आणखी एक यादगार चित्रपट बनवला. दीये जलते है फूल खिलते है, नदिया से दरिया दरिया से सागर, मै शायर बदनाम यासारखी गाणी आजही लोकप्रिय आहे.

बावर्ची (१९७२)

PR
PR
रघु नावांच्या बावर्च्याची भूमिकेत राजेशने असा जीव फुंकला होता की ते हसवता-हसवता रडवत होते. त्यांच्या हास्यात कारूण्य होते. छोट्या-छोट्या कारणाने एकमेकांपासून दूर राहणार्‍या कुटुंबातील दरी रघु घटवतो. बावर्ची बनून नोकरी करताना तो कुटुंबातील सदस्यांना जोडण्याचे काम करतो. राजेशचा अभिनय इतका सरळ व सहज होता की ते अभिनय करत असल्याचे भासतच नव्हते. त्यांनी हे पात्र जीवंत केल होतं.

अमर प्रेम (१९७२)

PR
PR
शक्ति सामंतांनी 'अमर प्रेम' मध्ये पुष्पा आणि आनंद बाबूंचे निश्चल प्रेम यामध्ये दाखवले होते. वैवाहिक जीवनातील नैराश्य, एकटेपणाची दु:ख राजेशने यामध्ये अप्रतिपणे अभिव्यक्त केले होते. या चित्रपटाच्या कथानकात दु:ख होते, वेदना होती. सहजा दु:खभरे चित्रपट बघने प्रेक्षक पसंत करत नाहीत, मात्र हा चित्रपट तिकीट खिडकीवर सुपरहिट झाला होता.

या चित्रपटांशिवाय इत्तेफाक, आपकी कसम, सफर, सच्चा झूठा, रोटी, कटी पतंग, दाग यासारखे कित्येक सदाबहार चित्रपट राजेश खन्नाने दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा