१५ वर्षांनंतर भारताने ज्युनियर हॉकी विश्वचषक जिंकला

तब्बल पंधरा वर्षांनंतर भारताने बेल्जियमचा 2-1 असा धुव्वा उडवत ज्युनियर हॉकी विश्वचषक जिंकला आहे. लखनऊमध्ये झालेल्या सामन्यात गुरजंतसिंगने आठव्याच मिनिटाला गोल करुन भारताचे खाते उघडले. मग सिमरनजीत सिंगने 22 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. 
 
भारताने याआधी 2001 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक पटकावला होता. त्याआधी भारताने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनला हरवले. तर साखळी फेरीत भारताने कॅनडा, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला हरवले.

वेबदुनिया वर वाचा