विजयादशमीच्या दिवशी भारतीय क्रीडापटूंनी गोल्डन कामगिरी केली. 17 व्या आशियाई स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंनी दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले. भारताच्या दोन्ही कबड्डी संघांनी अंतिम सामन्यात इराणचा पराभव करत सुवर्णपदक पटकावून भारताच्या महिला आणि पुरुष संघाने विजयादशमीच्या दिवशी सोने लुटले. भारताने स्पर्धेत 11 व्या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.