मिथुन आणि श्रीदेवी ह्या दोघांनी याचा होकार ही दिला नाही आणि नकार ही केला नाही आहे, पण तेव्हा या गॉसिपला खरं मानण्यात आले होते. हे दोघेही 'जाग उठा इंसान'मध्ये सोबत काम करता करता एकमेकांच्या फारच नजीक आले होते. तेव्हा योगिता, मिथुनची बायको होती ही बाब श्रीदेवीला चांगल्या प्रकारे माहीत होती.
श्रीदेवीची इच्छा होती की मिथुनने त्याच्या बायकोला घटस्फोट द्यावा आणि याच अटीवर दोघांनी एका मंदिरात गुपचुप लग्न केले. जेव्हा ही गोष्ट योगिताच्या लक्षात आली तेव्हा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. याचा सरळ प्रभाव मिथुनवर पडला आणि योगिताला सोडण्याचा विचार त्याने सोडला. श्रीदेवीला ही बाब कळली तेव्हा ती नाराज झाली आणि तिने या 'गुपचुप विवाह'ला रद्द केले.