लग्नासाठी भावी वर आणि वधूला मानसिक दृष्टया मजबूत होणे गरजेचे आहे. लग्न जन्मोजन्माचे बंधन आहे. लग्नानन्तर मुला आणि मुलीच्या आयुष्यात बदल होतात. लव्ह मॅरेज असेल तर एकमेकांना जाणून घ्यायला काहीच वेळ लागत नाही. मात्र अरेंज मॅरेज असल्यास दोघांना एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ लागतो. नवीन लग्न झाल्यावर नात्याला घट्ट करण्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी काही नियमांना अवलंबवून वैवाहिक जीवन आनंदी करू शकता. चला तर या नियमांबद्दल जाणून घेऊ या.
तुम्ही एकत्र या काही क्रियाकलाप करू शकता, जसे की रात्रीचे जेवण करणे, आठवड्याच्या शेवटी सहलीला जाणे किंवा घरी चित्रपट पाहणे. तुम्ही संध्याकाळी फिरायला जाण्यासाठी आणि दिवसभराच्या गोष्टींबद्दल एकमेकांशी बोलण्यासाठी थोडा वेळ काढू शकता
एकमेकांसमोर मत मांडा
नात्यात कधीकधी वेळीच मत न मांडल्याने मतभेद होतात आणि हळूहळू नात्यात कटुता येऊ लागते. एकमेकांसमोर मते मांडल्यावर किंवा जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यावर नात्यात विश्वास वाढतो. वादाची स्थिती निर्माण झाल्यावर घाई घाईने काहीही बोलण्यापूर्वी संयमाने आणि शांततेने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. मनातील विचार एकमेकांसमोर मोकळेपणाने शेअर करा.