मराठा मोर्चा : परतीच्या वाटेवर अपघात ५ ठार

गुरूवार, 10 ऑगस्ट 2017 (13:16 IST)

मुंबईत मराठा मोर्चा जोरात झाला.त्याचा परिणामही लगेच दिसला मात्र यात परतीच्या वाटेवर असेलेल्या ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वडाळ्यात  ट्रकने दिलेल्या धडकेत चेंबूरमधल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर येवला-औरंगाबाद मार्गावर झालेल्या तिहेरी अपघात झाला. यामध्ये  तिघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर  चोघे  गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात सापडलेले  सातही जण मुंबईतला मराठा मूकमोर्चावरून घरी परतत होते. यावेळी ट्रक आणि 2 कारमध्ये सकाळी 7 च्या सुमारास अपघात झाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती