हवामान बदलामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेत त्यावर उपाय योजना सुचवणे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रतिबंधासाठी धोरणात्मक उपयोजना करणे.
शेतीचे तंत्रज्ञान, आर्थिक साहाय्य, सामाजिक आधार आणि मानसिक आरोग्यावर आधारित एकात्मक पद्धती विकसित करणे.
विभागीय आणि जिल्हास्तरावरील अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करणे.
विविध शासकीय, निमशासकीय आणि स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधणे.
तसेच शेतकऱ्यांनी केवळ आर्थिक अडचणींमुळे नव्हे, तर मानसिक अस्थैर्यामुळे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी हे टास्क फोर्स गावपातळीवर जाऊन समुपदेशन आणि मार्गदर्शनाचे काम करेल.