अनेक भागात तापमान घसरला असून सध्या ढगाळ वातावरण झाले आहे.
भारतीय हवामान खात्या कडून आज शुक्रवार आणि शनिवारी मुंबईसह उपनगरात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुरुवारी केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मनघालाय, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या भागात पावसाने हजेरी लावली. या सह लक्षद्वीप, दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र आणि दक्षिण तामिळनाडूच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.
महाराष्ट्रातील मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भाचाकाही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.महाराष्ट्रात यंदा 5 ते 6 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून यंदा 30 मे रोजी केरळात मान्सून दाखल झाला आहे.या मुळे राज्यातील वातावरण बदलले असून सध्या ढगाळ वातावरण आहे. तापमानात घट झाली असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.